नवी दिल्ली – दिल्लीतील प्रचारसभेत संरक्षण मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे नेते राजनाथ सिंह यांनी आज मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना जोरदार लक्ष्य केले. केजरीवाल यांनी आपले गुरू अण्णा हजारे यांना धोका दिला. असे असताना केजरीवाल दिल्लीच्या जनतेचा विश्वास कसा जिंकतील? आम आदमी पार्टीने जी आश्वासने दिली ती कधीच पूर्ण केली नाही असे राजनाथ म्हणाले.
द्वारका येथे झालेल्या प्रचारसभेत ते म्हणाले की आपने आपले वादे कधीच पूर्ण केले नाहीत. ते दिल्लीतील महिलांना सुरक्षा देऊ शकले नाहीत आणि त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताच अधिकार नाही.
आता ते कॉंग्रेस पक्षाची बी टीम म्हणून काम करत आहेत. त्यांनी अगोदर काय काय आश्वासने दिली होती याबाबत मला बोलायचे आहे. ते दिल्लीच्या जनतेचा विश्वास कसा प्राप्त करतील हा माझा सवाल आहे. ते म्हणतात की दिल्लीतील लोकांना धोका देणार नाही, मात्र यावर विश्वास कसा ठेवायचा. अण्णा हजारे यांना नको म्हणत राहीले आणि यांनी स्वत:चा राजकीय पक्ष स्थापन केला. आपल्या गुरूचे म्हणणेही त्यांनी ऐकले नाही.
आम्ही दिल्लीचे लंडन करू असेही केजरीवाल म्हणाले होते. मात्र त्यांचे विचारच किती लहान आहेत. आज भारत लंडनच्या खूप पुढे निघून गेला आहे. केजरीवालांनी यमुना नदीच्या संदर्भात दिल्लीकरांना अनेक आश्वासने दिली होती. मात्र आजपर्यंत ही नदी स्वच्छ झाली नाही. ही मंडळी फक्त खोटी आश्वासने देतात.