Shivraj Singh Chauhan । मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनीआज लोकसभा निवडणुकीबाबत मोठा दावा केला. “एकट्या भाजपला 370 जागा मिळतील आणि एनडीएसोबत आम्हाला 400 पेक्षा जास्त जागा मिळतील.” असा दावा त्यांनी केलाय. भाजपच्या वतीने पत्रकार परिषदेत बोलताना शिवराज सिंह चौहान म्हणाले की, नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान होणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह अनेक भाजप नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे.
काय म्हणाले पीएम मोदी? Shivraj Singh Chauhan ।
बुधवारी दिल्लीत रॅली करताना पंतप्रधान मोदींनी “पाच टप्प्यातील निवडणुकांनंतर जनतेने भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारला निवडून दिल्याचे स्पष्ट झाले आहे. आम्हाला बहुमत मिळणार आहे.”असे म्हटले होते.
काय म्हणाले अमित शहा आणि राजनाथ सिंह? Shivraj Singh Chauhan ।
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पश्चिम बंगालमधील कांठी येथे एका सभेत म्हणाले होते, “आतापर्यंत एनडीएची स्थिती काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे का? मी तुम्हाला सांगू शकतो की पहिल्या पाच टप्प्यांनंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएने आधीच 310 चा आकडा पार केला आहे.
दरम्यान, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी आयएएनएसला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाल्यानंतर हे स्पष्ट झाले आहे की, आम्ही 400 पार करण्याचे लक्ष्य गाठू.
किती जागांवर झाले मतदान?
पाचव्या टप्प्याच्या समाप्तीसह, 25 राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमधील 428 लोकसभा जागांवर मतदान झाले आहे. पुढील टप्प्यासाठी 25 मे रोजी मतदान होणार आहे. शेवटच्या टप्प्यासाठी १ जून रोजी मतदान होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल ४ जूनला लागणार आहे.