मुंबई – मुख्यमंत्रीपदावरून शिवसेना-भाजपमध्ये रस्सीखेच चालू आहे. या स्थितीवर पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारा एकच मुख्यमंत्री हवा असल्याचे वक्तव्य केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.
Ramdas Athawale, Republican Party of India: We want one chief minister who continues for the entire five-year term. https://t.co/K03Y6NBazO
— ANI (@ANI) October 31, 2019
रामदास आठवले म्हणाले कि, भाजपाने विधीमंडळाच्या नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड केली असून त्याला आमचा पूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. महायुतीला लोकांचा जनादेश मिळाला आहे. पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल असा एकच मुख्यमंत्री हवा अशी आमची मागणी आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमचाही पाठिंबा आहे, असे आठवले यांनी म्हंटले आहे.
Ramdas Athawale, Republican Party of India: The ‘mahayuti’ (BJP-Shiv Sena alliance) has got a clear majority. Yesterday Devendra Fadnavis was elected BJP legislative leader. We have decided to support his name for chief minister as he is the only front runner for us. pic.twitter.com/RLHfsC7DJF
— ANI (@ANI) October 31, 2019
दरम्यान, मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये दरी निर्माण झाली आहे. दोन्ही पक्ष आपल्या भूमिकांवर ठाम आहेत. सत्तास्थापनेसाठी दोन्ही पक्षांनी दोन पावले मागे यावे. भाजपचा मुख्यमंत्री आणि शिवसेनेचा उपमुख्यमंत्री असा फॉर्म्युला होऊ शकतो. शिवसेना आमच्या सोबत असणे गरजेचे आहे. येत्या दोन दिवसात शपथविधी पार पडला पाहिजे. राज्यात अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी लवकरात लवकर सरकार स्थापन होणे गरजेचे आहेत, असे रामदास आठवलेंनी बुधवारी म्हंटले होते.