इस्लामाबाद : जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम 370 केंद्र सरकारकडून रद्द करण्यात पाकिस्तान भारताच्या बाबती एका पाठोपाठ एक निर्णय घेताना दिसत आहे. कारण भारतासोबतचे पाकने द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडले आहेत. यानंतर आता पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. एअर इंडियाच्या एका अधिकाऱ्याने याविषयी माहिती दिली आहे.
Flights from Afghanistan have been instructed to take alternative routes by Pakistan Civil Aviation Authority (PCAA). https://t.co/Hhz4yoygF0
— ANI (@ANI) August 7, 2019
पाकिस्तानने काही काळासाठी आपली हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे विमानांच्या मार्गांमध्येही काही बदल करण्यात आले आहेत. भारताने जम्मू काश्मीरमधून कलम 370 हटवल्याच्या विरोधात पाकिस्तानने हा निर्णय घेतला असल्याची माहिती मिळत आहे. पाकिस्तानच्या सिव्हिल ऍव्हिएशन ऑथॉरिटीद्वारे एक नोटीस देण्यात आली आहे. त्यामध्ये 6 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान ही हवाई हद्द बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.