सातारा – रविवारी दुपारी जिल्ह्याच्या विविध भागात वाऱ्यासह वादळी पावसाने जोरदार सुरुवात केली. दुपारी अचानक आलेल्या पावसामुळे सातारा शहरातही विविध ठिकाणी अणारे मोठमोठे बोर्ड वाऱ्यामुळे पडले. तसेच सातारा बसस्थानकात असलेला पत्र्याचा बोर्डही वाऱ्यामुळे खाली पडला. सुदैवाने या घटनेत कोणतीही दुर्घटना झालेली नाही.
पावसामुळे शहरातील रस्ते, नाले तुडुंब भरून वाहत होते. गेल्या अनेक दिवसांपासून उकाड्याने वाढलेल्या तगमगीतून पावसामुळे सुटका झाली. यंदाच्या उन्हाळ्यात एकही अवकाळी पाऊस झाला नव्हता. तसेच उन्हाळ्याची तीव्रताही प्रचंड असल्याने बळीराजाप्रमाणेच शहरातील नागरिकही पावसाची आतुरतेने वाट पाहत होते. दुपारी आलेल्या पावसात अनेकांनी भिजण्याचा आनंद घेतला.