मुंबई : राज्याचे राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी आज गडचिरोली जिल्ह्यात झालेल्या नक्षली हल्ल्यामध्ये वीरमरण प्राप्त झालेल्या पोलीस जवानांना आपली श्रद्धांजली वाहिली आहे, तसेच नक्षलवादी हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध केला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात आज झालेल्या दुर्दैवी नक्षली हल्ल्यात राज्याने आपले शूरवीर पोलीस जवान गमावले असल्याचे समजून तीव्र दुःख झाले. या भ्याड नक्षली हल्ल्याचा कठोर शब्दात निषेध करतो. या हल्ल्यात वीरगती प्राप्त झालेल्या सर्व पोलीस जवानांच्या कुटुंबीयांना आपल्या शोकसंवेदना कळवितो, असे राज्यपालांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.