पावसाळा सुरू झाला की तरुणाईसह भटकंती करणारे अनेक लोक दाट जंगलात फिरण्यासाठी उतावीळ होतात. पुण्याजवळ अनेक “जंगल ट्रेक’वर पर्यटकांची गर्दी दिसून येते. देवकुंड धबधबा परीसरात दरवर्षी हजारो पर्यटक येत असतात. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी घातली आहे.
वृत्त माध्यमांशी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळ्यात वर्षा सहलींदरम्यान पर्यटकांच्या होणाऱ्या मृत्यूची दखल घेऊन, जिल्हा प्रशासनाने देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील वर्षा सहलींवर बंदी घातली आहे. या निर्णयामुळे स्थानिकांचा रोजगार बुडणार असल्याने योग्य खबरदारी घेऊन वर्षा पर्यटन सुरू ठेवण्याची विनंती स्थानिकांनी केली आहे.
दरम्यान, पर्यटकांचा बुडून मृत्यू झाल्याचा घटना कर्जत, खोपोली, मुरुड आणि माणगाव या पर्यटन केंद्रांवर गेल्या दोन वर्षांत ३५ हून अधिक पर्यटकांचा बुडून मृत्यू झाला आहे. मद्यप्राशन करून पाण्यात उतरणे, स्थानिकांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करणे, भौगोलिक परीस्थितीचे ज्ञान नसणे यासारखे घटक यास कारणीभूत ठरत आहेत.
पर्यटकांच्या मृत्यू संख्येत वाढ झाल्यामुळे देवकुंड धबधबा, सिक्रेट पॉईंट आणि ताम्हाणी घाटातील पावसाळी पर्यटन केंद्रांवर प्रवेश बंदी घालण्यात आली आहे. याबाबातचे आदेश माणगावचे उपविभागीय अधिकारी उमेश बिरारी यांनी जारी केले आहेत. पण या आदेशानंतर पर्यटकांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.