चितगाव – रोहित शर्मा अंगठ्याला झालेल्या दुखापतीवर उपचार करुन घेण्यासाठी मायदेशी परतल्यानंतर लोकेश राहुलच्या नेतृत्वात भारतीय संघ उद्या यजमान बांगलादेशविरुद्धच्या तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या ( BAN vs IND ) लढतीत मैदानात उतरणार आहे. या मालिकेतील पहिले दोन्ही सामने जिंकून बांगलादेशने मालिका यापूर्वी जिंकली असली तरीही अखेरचा सामना जिंकून प्रतिष्ठा राखण्याची भारताला संधी आहे.
सानियासोबत घटस्फोट घेणार असल्याच्या चर्चांवर शोएब स्पष्टच बोलला; म्हणाला, “विभक्त होण्याचा…”
नियमित कर्णधार रोहितसह दुखापतीमुळे या लढतीत दीपक चहर व कुलदीप सेन खेळू शकणार नसल्याचेही सांगण्यात आले आहे. बराच काळ संघाबाहेर असलेल्या फिरकी गोलंदाज कुलदीप यादवला या सामन्यासाठी संघात स्थान देण्यात आले आहे.
बांगलादेशने या मालिकेत फलंदाजी, गोलंदाजी व नेतृत्व या तीनही गोष्टीत भारतापेक्षा सरस कामगिरी केली.
त्यांनी पहिला ( BAN vs IND ) सामना जिंकल्यावर दुसरा सामना जिंकत मालिकेत बरोबरी करण्याची संधी भारताला मिळाली होती. मात्र, क्षेत्ररक्षण करताना अंगठ्याला दुखापत झालेला रोहित तळात फलंदाजीला आला व त्यानेही शर्थीचे प्रयत्न करुनही भारताला पराभव स्वीकारावा लागला होता. आता तिसऱ्या सामन्यात तो खेळणार नसल्याचे समोर आल्यामुळे अंतिम संघ कसा असेल याकडे लक्ष लागले आहे.
💬 💬 “Every game is important for us.”
Here’s what @Sundarwashi5 said ahead of the third & final #BANvIND ODI. #TeamIndia pic.twitter.com/59HJgfBTxd
— BCCI (@BCCI) December 9, 2022
राहुलकडे नेतृत्व दिलेले असल्याने तोच शिखऱ धवनसह डावाची सुरुवात करेल, त्यामुळे इशान किशनला स्थान मिळाले का असा प्रश्न आहे. तसेच दुसऱ्या सामन्यात राहुल मधल्या फळीत खेळला होता त्यामुळे या सामन्यात इशान व धवन सलामीला येणार का असाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सामन्यानंतर भारत व बांगलादेश यांच्यात कसोटी मालिकाही होत असल्याने त्यापूर्वी हा सामना जिंकत आगामी मालिकेसाठी मानसिकता उंचावण्याची संधीही भारतीय संघासमोर आहे.