नाने मावळ, (वार्ताहर) – मावळ तालुका हा संताची भूमी म्हणून ओळखली जातो. तालुक्यात मोठ्या प्रमाणात जमिनीला भाव आला आहे. त्यातून मिळणारा पैसा महत्त्वाचा असून ह्याच पैसातून आजच्या घडीला लग्नासाठी मोठ्या प्रमाणात खर्च केला जात आहे.
मागच्या पिढीतील वडीलधारे माणसे सांगतात, पूर्वीच्या लग्नात साधेपणा आणि कमी खर्चिक होता, तर आताचे लग्न खर्चिक आणि डामडौल, देखावे जास्त. पूर्वी साखरपुढ्यापासून लग्नाची गाणी वैगेरे म्हटली जायची सध्या फक्त डीजे वाजतात. काही ठिकाणी रितीरिवाज (संस्कृती) नुसार लग्न होतात. पण पुढे ही संस्कृती देखील लोप पावेल. असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
पूर्वीच्या लग्नात जे कार्यक्रम जो उत्साह असायचा कित्तेक दिवस तो आज एक दोन दिवसात संपतो. आणि लग्नासाठी असणाऱ्या अपेक्षा व इतर गोष्टीमध्ये देखील बदल झाला आहे. म्हटलं तर बराच फरक आहे, म्हटलं तर काडीचाही बदल नाही.
पूर्वीसुद्धा लग्न ठरवताना जात-पात, पत्रिका, पगार हे बघितल्या जायचं. आजही तीच परिस्थिती आहे. पूर्वीसुद्धा लग्न म्हणजे ऐपतीच्या मानाने खर्चिक सोहोळा होता. आजही लग्नात वारेमाप खर्च होतो. पूर्वीसुद्धा लग्नात वचनं दिली, घेतली जायची, आजही ही पद्धत टिकून आहे.
लग्नाकडे बघण्याचा हा बदललेला दृष्टिकोणच पूर्वीच्या आणि आत्ताच्या लग्नातला फार मोठा फरक आहे. नाही कारण मागच्या पिढीतील वडीलधाऱ्या माणसा सांगतात. पूर्वीच्या लग्नात साधेपणा आणि कमी खर्चिक होते, घरोघरी जाऊन लग्न पत्रिका वाटल्या जायच्या, परंतु आजच्या स्थितीला मोबाईल जमान्यात लग्नपत्रिका लोप पावत चालली आहे.
कोरोनाच्या काळात मावळ तालुक्यात लग्न हि साधा पद्धतीने होत होती. परंतु जसा कोरोना संपला तसा मोठ्या प्रमाणत बदल झाला. पूर्वी मांडव टाळा हा सध्या पद्धतीने असायचा, आता मात्र मांडव टाळ्याला डीजे असतो.
मावळ तालुक्यात मोठ्या प्रमाणत खर्च करून लग्न सोहळा थाटा माठात केला जातो. पण सर्वसामान्य माणसाला ह्या रीतीरीवजापासून थोड्य फार बाजूला सरकता येते नाही. कारण लग्न सोहळा नवीन प्रथा ही भविष्यात घातक बनणार आहे. असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत.