पुणे (बारामती) – काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये सध्या ‘भारत जोडो’ यात्रा सुरु आहे. देशाच्या एका टोकापासून निघालेल्या या यात्रेने हजारो मैलाचा टप्पा पूर्ण केला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वामध्ये सुरु असलेल्या या यात्रेला सर्वसामान्यांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे देखील पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील या यात्रेत सहभागी होण्याबाबत भाष्य केलं आहे.
भारत जोडो याचा अर्थ काय ? याचा अर्थ वेगवेगळ्या जातीय,भाषिक यांना एकत्रित करण्याची प्रक्रिया हा त्याचा उद्देश आहे म्हणून या कार्यक्रमाला शुभेच्छा देण्यासाठी ज्या ठिकाणी जमेल त्या ठिकाणी आम्ही काही जण जाणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. बारामतीमध्ये पत्रकारांशी सवांद साधताना पवारांनी विविध राजकीय घडामोडींवर देखील भाष्य केलं.
भारत जोडो यात्रेबद्दल बोलताना ते म्हणाले,”राज्यातील काँग्रेसचे नेते मला भेटायला आहे. त्यात अशोक चव्हाण,बाळासाहेब थोरात आणि अन्य सहकारी होते.त्यांनी विनंती केली;खरतर हा एका पक्षाचा कार्यक्रम आहे परंतु भारत जोडोच्या माध्यमातून समाजात सामंजस्य निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणून आम्ही काही पक्षाचे लोक त्याठिकाणी एकदा जाणार असलयाचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.
म्हणून आशिष शेलारांसोबत
काही दिवसांपूर्वी क्रिकेटसाठी पवार शेलार एकत्र आले होते मात्र त्यावरून राजकीय चर्चा सुरु झाल्या होत्या. त्याबाबत देखील पवारांनी यावेळी भाष्य केले. ते म्हणाले, जे लोक राजकारण करीत आहेत त्यांचं ते अज्ञान आहे..काही ठिकाण अशी असतात त्यात राजकारण आणायचे नसते असं म्हणत पवारांनी ते बीसीआयचे अध्यक्ष असतानाच किस्सा देखील सांगितला.बीसीसीआयच्या अध्यक्ष स्थानी असताना गुजरातचे प्रतिनिधी मोदी होते, दिल्लीचे प्रतिनिधी जेटली होते, तर सध्याचे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर ते ही हिमाचलचे अध्यक्ष होते आणि हे सर्वजण माझ्यासोबत मीटिंगला असायचे असं म्हणत पवारांनी काही ठिकाणी राजकारण आणायचे नसते हा मुद्दा अधोरेखित केला.