मुंबई – गतवर्षी ऑगस्ट महिन्यातील 19 आणि 21 तारखेला संपूर्ण कराड शहर पाण्याखाली होते. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या अधिन राहून पावसामुळे या निवडणुका पुढे ढकला. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू असल्याचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील म्हणाले.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वात भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांची आज भेट घेतली. या भेटीनंतर चंद्रकांत पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाउस पडत आहे. राज्यातील काही जिल्हयांमध्ये पुरस्थिती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत निवडणुका पुढे ढकलल्या पाहिजेत. यामध्ये आमचा एक सामाजिक हेतू आहे. जर या निवडणुका पुढे ढकलण्यात आल्या आणि तेवढ्यात ओबीसीचे आरक्षण मिळाल्यास ओबीसीसह या निवडणुका होतील. अन्यथा पुढील पाच वर्ष त्या 92 ठिकाणी ओबीसीला प्रतिनिधित्व राहणार नाही. मात्र, ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घ्या, असे न्यायालयाने सांगितल्यानंतर तुम्ही लगेच कामाला लागलात. त्याचप्रमाणे प्रभाग आणि यादी सुद्धा ठरवण्यात आली, असे ते म्हणाले.
राज्यात सर्वदूर पडणारा पाऊस, त्यामुळे प्रशासकीय यंत्रणेवर येणारा ताण तसंच ओबीसी राजकीय आरक्षणाचा अनुत्तरित प्रश्न लक्षात घेता नगरपालिका निवडणुका पुढे ढकला, असं निवेदन राज्य निवडणूक आयोगातील अधिकाऱ्यांना दिलं. आ.@cbawankule, आ.@girishdmahajan आणि पदाधिकारीही उपस्थित होते. pic.twitter.com/Hp46QwfllG
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) July 11, 2022
पण सुप्रीम कोर्टात एक मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. प्रचंड पाऊस मागील काही वर्ष महाराष्ट्रात असतो. त्यामुळे पावसाचे दिवस किमान टाळले जावेत. तसं न होता अचानकपणे या निवडणुका जाहीर करण्यात आल्या. त्यामुळे आम्ही 92 नगरपालिका आणि 4 नगर पंचायतीच्या प्रतिनिधींना घेऊन आज निवडणूक आयोगाचे प्रमुख मदान यांना भेटलो, असेही त्यांनी स्पष्ट केले.