मुंबई – बंडखोरी करत शिवसेनेच्या 40 आमदारांनी भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री तर, भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. दरम्यान, राज्यात होवू घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक भाजप आणि शिंदे गट एकत्र लढणार असल्याचे संकेत एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे खासदार आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी दिले आहेत.
मुलाखतीत केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दानवे म्हणाले, शिवसेनेचे 12 खासदार पक्षातून बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. तर मूळ शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच आहे. यापूर्वीसुद्धा मुलायम सिंह आणि अखिलेश यादव यांच्या वादात सायकल चिन्ह मुलायम सिंह यांच्याऐवजी अखिलेश यादव यांना आले होते. त्यामुळे मला असे वाटते हे प्रकरण कोर्टात गेले तर निवडणूक आयोग असो की न्यायालय 2/3 बहुमत असल्याने खरी शिवसेना शिंदे यांचीच असल्याचे सिद्ध होईल. तर, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत घटक पक्षाबरोबर शिंदे गटातील प्रतिनिधी आमच्यासोबत आल्यास त्यांना सुद्धा सामील करून घेऊ, असे दानवे म्हणाले.
राष्ट्रपती निवडणुकीबाबत बोलतांना दानवे म्हणाले, भाजपच्या राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांना उद्धव ठाकरे यांनी पाठिंबा दिला तर आम्ही त्यांचे स्वागत करू, असे दानवे म्हणाले. तर राष्ट्रवादीकडून 27 टक्के ओबीसी उमेदवार देण्याच्या घोषणेबाबत बोलतांना दानवे म्हणाले, ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत भाजपने अगोदरच भूमिका घेतली असून, ओबीसी उमेदवारांना आरक्षणाप्रमाणे उमेदवारी देणार असल्याचे स्पष्ट केले असल्याचे दानवे म्हणाले.
राष्ट्रवादीचा मोठा निर्णय! “येत्या निवडणुका ओबीसी आरक्षणासहित होत नसतील तर….”