मुंबई – केंद्रिय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीक करताना आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर राज्यातील राजकारण चांगलेच तापलेले बघायला मिळत आहे. यावर कॉंग्रेसने आपली प्रतिक्रिया दिली आहे. राणे यांनी अशी वक्तव्य करून राज्यातलं वातावरण खराब करणं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.
https://www.facebook.com/edainikprabhat/videos/264856408562628
नाना पटोले म्हणाले की, काँग्रेस राणेंच्या वक्तव्याचा निषेध करते. खरंतर आम्हाला आनंद झाला होता की राज्यातले खूप सारे नेते केंद्रात मंत्री झाले आहेत, राज्याला त्याचा फायदा होईल. पण अशी वक्तव्य करून राज्यातलं वातावरण खराब करणं, महाराष्ट्राच्या संस्कृतीला न शोभणारं आहे अशी प्रतिक्रिया कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राणे यांच्या वक्यव्यावरुन दिली आहे.