वाघोली( प्रतिनिधी) : वाघोली-केसनंद (ता. हवेली) राज्य महामार्गाची अतिशय दुरावस्था झाली आहे. या रस्त्याचे सिमेंट कॉंक्रीटीकरण करावे अशी मागणी पुणे जिल्हा युवा मोर्चाचे संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी संबधित विभागाकडे लावून धरली होती. अनेकवेळा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष भेटून व निवेदनाद्वारे पाठपुरावा देखील केला होता. सातव यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले होते त्यानुसार असून सा. बां. विभागाकडून २ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्या आला होता. या रस्त्याची ईनिविदा प्रक्रिया पूर्ण होवून शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या उपस्थितीत ऑनलाईन या रस्त्याचे उद्घाटन देखील करण्यात आले होते.
मात्र रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात होण्यास उशीर झाल्याने सदर रस्ता आता खड्ड्यांची मालिका बनला असून या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचल्याने रस्ता जलमय झाला असून नागरिकांचे अतोनात हाल होऊ लागले आहेत. तातडीने रस्त्याचे काम करावे आणि अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भाजप युवा मोर्चा संघटन सरचिटणीस संदीप सातव यांनी दिला आहे.
“केसनंद रस्त्याच्या कामासाठी निधी मंजूर होऊन निविदा प्रक्रिया देखील पूर्ण झाली आहे . या रस्त्याचे ऑनलाईन उद्घाटन देखील झाले आहेत तरीदेखील रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात न झाल्याने रस्ता खड्डेमय व जलमय बनला आहे. हा रस्ता तीर्थक्षेत्र थेऊर, सोलापूर रस्त्याला जोडणारा एकमेव आहे. शाळा, महाविद्यालये, कंपन्या, सोसायट्या या रस्त्यावर असल्यामुळे नेहमीच वाहनांची वर्दळ असते. येत्या आठ दिवसाच्या आत रस्त्याच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल”.
– संदीप सातव (संघटन सरचिटणीस पुणे जिल्हा युवा मोर्चा)
केसनंद फाटा ते काळेचा ओढा याठिकाणी रस्त्यावर मोठ्याप्रमाणावर खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना छोटे-मोठे अपघाताला सामोरे जावे लागत आहे. पावसाळ्यात आता खड्यांमध्ये साचणाऱ्या पाण्यामुळे या रस्त्याची अजूनच स्थिती गंभीर बनली आहे. खड्यांमुळे वाहनधारकांसह नागरिकांना छोट्यामोठ्या अपघातांना सामोरे जावे लागत आहे.
संदीप सातव यांनी पुढाकार घेऊन सहकाऱ्यांच्या मदतीने स्वखर्चाने अनेकवेळा खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती केली होती. परंतु काही दिवसातच ‘जैसे थे’ परिस्थिती निर्माण झाल्याने सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्त्काळ रस्त्याचे काम करण्याची मागणी संदीप सातव यांनी केली आहे.वारंवार मागणी करून सुद्धा रस्त्याचे काम होत नसल्यामुळे अखेर सातव यांनी आठ दिवसात रस्त्याची दुरुस्ती करावी अन्यथा संबधित विभागाच्या कार्यालयावर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा दिला आहे.