देशातील तरुणांचे आशास्थान असणारे आणि आयडिया ऑफ इंडिया या देशाच्या घटनेशी जोडलेल्या संकल्पनेशी जोडलेल्या राजकारणाचे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून नेतृत्व करणारे खासदार राहूल गांधी यांना 19 जून या दिवशी 51 वर्षे पूर्ण होत आहेत. त्यांना त्यानिमित्त शुभेच्छा देतो. कोरोना व्हायरसमुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे त्यांचा वाढदिवस सार्याष देशभर दरवर्षीप्रमाणे मोठया प्रमाणावर साजरा होणार नाही. मात्र कोट्यावधींच्या शुभेच्छा त्यांच्यासाठी जरुर आहेत. नेहरु-गांधी घराण्याचा दैदिप्यमान राजकिय वारसा असणार्याय राहुल गांधींना वयाच्या अवघ्या 14 आणि 21 वर्षाचे असतानाच दोन मोठे आघात सहन करावे लागले. ते अवघे 14 वर्षांचे असताना त्यांची आजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांची दहशतवाद्यांनी केलेली हत्या आणि वयाच्या 21 वर्षांचे असताना वडील माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची अतिरेक्यांनी केलेली हत्या या आघातांना त्यांना सामोरे जावे लागले. परदेशात उच्च शिक्षण पूर्ण करुन परत आल्यावर काँग्रस पक्षाच्या माध्यमातून सक्रीय राजकारण करीत देशसेवा करण्याची मानसिकता त्यांची घडली होती. राष्ट्रीय एकात्मता, सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समता या काँग्रेस पक्षाच्या विचारांची शिदोरी घेत त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सक्रिय राजकारणात प्रवेश केला आणि काँग्रेस पक्षाध्यक्षा मातोश्री श्रीमती सोनिया गांधी यांचे ते आधार बनत गेले.
प्रथम पासूनच देशातील युवकांची शक्ती एकवटून या युवाशक्तीची उर्जा देशसेवेसाठी सत्कारर्णी लागावी ही भावना त्यांच्या मनात दृढ होती. प्रथम पासूनच एनएसयुआय आणि युवक काँग्रेस या माध्यमातून देशातील तरुणांना काँग्रेस विचारांकडे आकर्षित करण्यावर त्यांनी मोठा भर दिला. याबरोबरच देशातील गोरगरीब, कष्टकरी, श्रमीक, वंचित, दलित, आदिवासी, मागासवर्गिय, कामगार व महिला यांना संसघटीत करण्यावर त्यांचा विशेष भर राहिला.
काही काळातच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे ते सरचिटणीस बनले. जुने जाणते काँग्रेस नेतृत्व यांचा मान राखत युवा नेतृत्वावर विशेष जबाबदारी टाकत त्यांनी जुन्या व नव्या पिढ्यांचा अतिशय चांगला समन्वय साधला. काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष झाले त्या कारकिर्दीत त्यांना त्यामुळेच जुन्या आणि नव्या अशा दोन्ही पिढ्यांचे समर्थन सहजपणे लाभले.
वयाच्या 34व्या वर्षी सन 2004 मध्ये उत्तर प्रदेशातील अमेठी लोकसभा मतदार संघातून ते प्रथम लोकसभेवर निवडून गेले. लोकसभा 2009 आणि 2014 मध्येही ते अमेठीचे खासदार बनले तर 2019 मध्ये केरळमधील वायनाड येथून ते लोकसभेचे खासदार बनले. सन 2004 ते 2014 या कालावधीत युपीएचे सरकार डॉ.मनमोहन सिंह यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत असताना राहुल गांधी यांनी केंद्रीय मंत्रीपद स्विकारावे हा आग्रह त्यांना अनेकदा झाला. मात्र हा आग्रह नम्रपणे नाकारुन पक्ष संघटनेतच काम करण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला. त्याचबरोबर संसदेमध्ये सर्वसामान्य जनतेचे प्रश्न समर्थपणे मांडून त्यांनी देशाच्या राजकारणालाही सदैव चांगले वळण दिले.
उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने जमिन सुधारणा कायद्यात बदल करून शेतकर्यां ना दिला जाणारा मोबदला कमी करण्यासाठी रचलेले षडयंत्र राहुल गांधींच्या तीव्र संघर्षामुळे फसले. सुमारे दहा वर्षांपुर्वी म्हणजे सन 2011 मध्ये ग्रेटर नॉयडा येथील भट्टापारसाऊर येथे शेतकर्यां च्या तीव्र आंदोनलाचे त्यांनी नेतृत्व केले आणि उत्तरप्रदेश भाजप सरकारचे शेतकरी विरोधी धोरण हाणून पाडले. भ्रष्ट राजकारण्यांवर वचक बसण्यासाठी लोकपाल विधेयक आणण्यावर त्यांचा आग्रह राहिला. तसाच महिलांना लोकसभा आणि विधानसभेत 33 टक्के आरक्षण मिळावे यासाठी ते आग्रही राहिले. राज्यसभेत ते विधेयक मंजूरही झाले मात्र लोकसभेत ते पारीत होऊ शकले नाही. देशातील कोट्यावधी जनतेला किमान भोजन मिळावे यासाठी केंद्रातील काँग्रेस सरकारने केलेला अन्न सुरक्षा कायदा, ग्रामीण भागातील कोट्यावधी मजूरांना वर्षात किमान शंभर दिवस रोजगार मिळावा यासाठी केलेला महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा, सरकारच्या कारभारात पारदर्शकता यावी यासाठी केलेला माहितीच्या अधिकाराचा कायदा अशा काँग्रेसच्या प्रत्येक ऐतिहासिक निर्णयांमध्ये राहुल गांधींचा मोठा सहभाग राहिला. २०१९ च्या झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी ‘न्याय’ योजनेचा विचार या देशाला दिला. यानुसार देशातील कोट्यावधी गरीब कुटुंबांना दरमहा सहा हजार रुपये म्हणजे वर्षाला 72 हजार रुपये देण्याचीही क्रांतिकारी योजना होती. केंद्रात काँग्रेस सत्तेवर आल्यावर ही योजना राबवून देशातील कोट्यवधी जनतेला गरिबीतून वर आणण्याचे त्यांचे स्वप्न आहे.
सन 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सत्तेत आलेल्या एनडीए सरकारने औद्योगिकीकरणास चालना मिळावी या नावाखाली शेतकर्यांयच्या जमिनी मनमानी पध्दतीने व कमी मुल्यामध्ये ताब्यात घेण्यासाठी जमिन अधिग्रहण कायद्यात बदल करण्याचा प्रयत्न एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा वटहुकुम काढून केला. मात्र राहुल गांधींच्या आक्रमक नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनांमुळे प्रत्येक वेळी हा वटहुकुम बारगळला आणि शेतकर्यांावर अन्याय झाला नाही. फेब्रुवारी 2015 मध्ये दिल्लीतील रामलीला मैदानावर त्यांनी शेतकर्यांलचा अभूतपूर्व विराट मेळावा घेऊन देशाची धोरणे आखताना शेतकरी आणि ग्रामीण भारत याला झुकते माप द्यायलाच हवे हा संदेश दिला. ‘मोदी सरकार सूट-बूट की सरकार है’ ही राहुल गांधींनी मोदी सरकारवर केलेली आक्रमक टीका देशभर गाजली, भाजपाला तर फारच झोंबली. सरकारच्या चुकीच्या व संशयास्पद व्यवहारांबद्दल टीकेचे आसूड ओढण्यात राहुल गांधी कधीही डगमगले नाहीत. राफेल लष्करी विमान खरेदी प्रकरणात ‘चौकीदार चोर है’ असा प्रचार करुन त्यांनी सत्ताधार्यां ची झोप उडवली तर ‘मुठभर धनीक उद्योगमित्रांसाठी मोदी सरकार काम करीत आहे’ असे आरोप करुन त्यांनी मोदी सरकारला बचावात्मक धोरण घेण्यास भाग पाडले. मागील वर्षी १५ जून रोजी चीनने लदाख परिसरात केलेल्या अतिक्रमणाबाबतची गेल्या वर्षभरातील सद्यस्थिती जनतेला कळावी यासाठी ते सतत आग्रही राहिले आहेत. त्याचवेळी चिनी लष्कराला रोखण्यासाठी भारतीय लष्कराने केलेल्या कामगिरीबद्दल त्यांनी भरभरून कौतुक केले. सामाजिक स्तरावर देखील राहुल गांधी सदैव आघाडीवर राहिले. गुजरातमध्ये चार दलितांची झालेली हत्या अथवा हैदराबाद येथे रोहीत वेमुला या दलीत तरुणाची आत्महत्या तसेच उत्तर प्रदेशात दलित तरुणीवर सामुहिक बलात्कार करणाऱ्यांना जबर शिक्षा व्हावी व मृत्युमुखी पडलेल्या या युवतीस न्याय मिळावा यासाठी उत्तर प्रदेशच्या भाजप सरकारने केलेली नाकेबंदी झुगारून त्या कुटुंबाची त्यांनी प्रियांका गांधींसमवेत घेतलेली भेट अशा प्रत्येक वेळी राहुल गांधी तेथे धावून गेले आणि दलीत जनतेचे आधार बनले.
कोणत्याही प्रश्नाचा सखोल अभ्यास करण्याची वृत्ती, सर्वसामान्य जनतेत मिसळून त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी झोकून काम करण्याची वृत्ती, बेरोजगार तरुणांचा आवाज बुलंद करून तरुणांच्या प्रश्नांवर अचूक बोट ठेवण्याची त्यांची हातोटी, मागील वर्षी करोनाच्या पहिल्या लाटेत उत्तर प्रदेश, बिहारकडे पायी जाणाऱ्या स्थलांतरित मजुरांना आधार, भविष्याचा वेध घेण्याची क्षमता आणि कष्टकरी, श्रमीक, गरीब, आदिवासी, दलित, अल्पसंख्यांक महिला आणि तरुण यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आत्मियतेने काम करण्याची कृती त्यामुळे राहुल गांधी हे आजही देशात आशेचे स्थान बनले आहेत. गरीब श्रमीकांसाठी त्यांचा हा कळवळा कोविड-19 कोरोना व्हायरसमुळे देशात लागू झालेल्या लॉकडाऊन काळातही दिसून येत आहे. कोरोना व्हायरसबद्दलचा इशारा त्यांनी 12 फेब्रुवारी रोजीच दिला होता. मात्र केंद्र सरकारला यातील गांभीर्य कळले नाही. देशातून कोट्यावधी स्थलांतरीत मजूर, श्रमीक मिळेल त्या वाहनाने अथवा पायी देखील त्यांच्या राज्यात परत निघाले. त्यांच्या वेदनेत आणि दुःखात प्रत्यक्ष सहभागी होऊन, त्यांना आधार देत राहुल गांधींनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून लाखो मजूर श्रमीकांना दोन वेळचे भोजन देण्याची व्यवस्था सार्या देशभर केली. तसेच त्यांना आपापल्या गावी जाण्यासाठी मोठ्या प्रमाणावर व्यवस्थाही केली. त्यामुळे गरीबांचा सच्चा कैवारी ही त्यांची असणारी प्रतिमा अधिक अधोरेखीत झाली. तसेच मोदी सरकारला कोरोना प्रश्न, ढासळती अर्थव्यवस्था, चीन बरोबरचा तणाव असे अनेक महत्वाचे प्रश्न समर्थपणे हाताळते आले नाहीत. त्यामुळेच भारतीय जनतेला आणि अन्य विरोधी पक्षांना देखील आता राहुल गांधींचे नेतृत्व हाच पर्याय असल्याचे वाटू लागले आहे. विशेषतः वयाच्या पन्नाशीनंतर राहुल गांधींचे नेतृत्व सर्वव्यापी होत राहील अशी अटकळही मानली जात आहे. काँग्रेस पक्ष आज संदर्भहिन झाला आहे असे म्हणणार्यांवना देखील काँग्रेस पक्ष जनसामान्यांच्या मध्ये पुन्हा खोलवर रुजु लागला आहे. याची जाणीव होऊ लागली आहे.
आंतरराष्ट्रीय राजकारणाची उत्तम जाण असणार्याख राहुल गांधींना जात, धर्म, पंथ, भाषा अशा अनिष्ठ बाबींमुळे समाजात निर्माण झालेल्या दरीचीही अचूक जाण आहे. त्यासाठी सर्वधर्म समभाव आणि सामाजिक समतेचा विचार म्हणजेच आयडीया ऑफ इंडिया हा राज्यघटनेवर बेतलेला विचार समाजात खोलवर रुजवण्यासाठी ते सदैव प्रयत्नशील राहिले आहेत. किंबहूना 21व्या शतकात नवा देश घडत असताना त्यांच्या रुपाने नवा जोश देशात निर्माण झाला आहे. ही देशाच्या दृष्टीने खूपच आशावादी बाब आहे.
संसदीय राजकारणात निवडणूकांना मोठे महत्व आहे. गेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीत त्यांनी केलेल्या झंझावाती प्रचारामुळे तेथे असणारी भाजपची सत्ता जाण्याची परिस्थिती निर्माण झाली होती. राजस्थान मध्यप्रदेश, झारखंड, छत्तीसगड, कर्नाटक अशा राज्यांमध्ये देखील त्यांच्या आश्वासक नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाने निवडणुका जिंकल्या. जेव्हा अपयश आले तेव्हा देखील ‘या अपयशाची जबाबदारी मी घेतो’ असे जाहिरपणे सांगून त्यांनी त्यांच्यातील वेगळेपण दाखवून दिले. निवडणुकीत किती जागा मिळाल्या या पेक्षा जनतेचे कोणते प्रश्न गसास लावण्यासाठी प्रयत्न केले गेले यावर नेतृत्वाची पारख होणे गरजेचे असते. त्यामुळेच त्यांचे नेतृत्वही निश्चितपणे सरस आहे असे म्हणता येईल.
सन 2004 मध्ये चालून आलेले पंतप्रधानपद नाकारुन काँगे्रस पक्ष अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधींनी नवा आदर्श घालून दिला. केंद्रात मंत्रिपद स्विकारण्याचा अनेकदा झालेला आग्रह नम्रपणे नाकारून राहुल गांधींनी देखील हाच पायंडा पुढे चालवला. सत्ताकारण आणि नोकरशाही यांचा अनुभव त्यांना घेता आला असता त्यापेक्षाही पक्षसंघटनेमार्फत जनतेचे प्रश्न अभ्यासून ते सोडविण्यावर त्यांचा कटाक्ष राहिला. त्यामुळेच देशाचे आशास्थान असणार्याश व कोट्यावधी जनतेच्या हृदयात प्रेमाने स्थान मिळविणार्यात राहुल गांधींना काँग्रेस पक्षाप्रमाणेच मोठे उज्वल भवितव्य आहे. कार्यकर्त्यांच्या व जनतेच्या मनात त्यांच्या विचारधारेबरोबरच कर्तृत्व आणि नेतृत्वामुळे निर्माण झालेला आदर व विश्वास, त्यांच्यातील लढाऊ बाणा या राहुल गांधींमधील गुणांमुळेच मोदींच्या नेतृत्वाला पर्याय म्हणून त्यांना लोकमान्यता मिळू लागली आहे. भविष्याचा वेध घेत काँग्रेसची नवीन बांधणी करीत आपले नेतृत्व सिद्ध करण्यास त्यांची सुरुवात झाली आहे. कटकारस्थाने आणि गळेकापू राजकारण न करता देखील त्यांचे नेतृत्व अधिक उंचीवर जात आहे. तसेच त्यांच्याबद्दलची विश्वासार्हता देखील वाढत आहे. त्यांची बघिनी काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी-वडेरा यांची देखील मोलाची साथ त्यांना लाभत आहे. त्यांच्या हातून अशीच लोकसेवा घडत राहो व त्यास सत्तेचे अधिष्ठान मिळून त्यांनी हाती घेतलेले लोकसेवेचेे व्रत सफल होवो व त्यातून त्यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भारत महासत्ता बनो हीच कोट्यावधी भारतियांच्या वतीने त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा!
करोना संकटकाळी करोना प्रतिबंधक लास निर्यात थांबवावी, रेम्दिसिवीर औषधाची निर्यात थांबवावी सीबीएसई परीक्षा रद्द कराव्यात, परदेशी कंपनांची लस भारतात तयार करण्यास परवानगी द्यावी, परेशी लास आयात करावी, या त्यांनी केंद्र सरकारकडे केलेल्या बहुमोल सूचना केंद्र सरकारला मान्य कारवाय लागल्या तसेच पश्चिम बंगालमध्ये करोनाचा प्रादुर्भाव वाढेल यासाठी जाहीर सभा व प्रचार थांबवानाचे त्यांनी घेतलेल्या निर्णयाचे सर्वांनाच अनुकरण करावे लागले. अश्या या दूरदृष्टीच्या उमद्या तरुण नेत्तृवास कोटी कोटी भारतीयांच्या वाढदिवसानिमित्त मनपूर्वक शुभेच्छा!
– आबा बागुल
पुणे महानगरपालिका, काँग्रेस पक्ष गटनेते.