कोल्हापूर : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचा छापा म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे. अनिल देशमुख यातून निर्दोष सुटतील असा मला विश्वास आहे. राजकीय हेतू डोळ्यासमोर ठेऊन ईडी, सीबीआय यांचा वापर केला जात आहे.
भाजपाकडून सरकार अस्थिर करण्याचा हा प्रयत्न आहे, यामध्ये ते कदापिही यशस्वी होणार नाहीत असे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हंटले आहे. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.