मुंबई : राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने अक्षरशः सर्वाना नको नको करून सोडले आहे. रुग्णांना बेड्स उपलब्ध नाहीत, ऑक्सिजनची कमतरता आणि त्यातच रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा या सर्व संकटाचा राज्याला सामना करावा लागत आहे. राज्यात अशी बिकट परिस्थिती असताना मंत्री नवाब मलिकांनी खळबळजनक दावा करत केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले आहेत.
Central government has just released the allocation data of #Remdesvir injection to various states in our country.#Maharashtra requires 50,000 injections per day, which our government has been demanding.
So far we have been receiving only 36,000 injections per day and now (1/3) pic.twitter.com/mVuwtBk3VU— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) April 21, 2021
मंत्री नवाब मलिकांनी ट्विट करत, राज्याला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर दिले जावेत अशी मागणी केली आहे. अन्यथा राज्यात मोठं संकट निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. नवाब मलिक यांनी म्हटलं आहे की, “केंद्र सरकारने त्वरित राज्यांना मुबलक प्रमाणात रेमडेसिविर इंजेक्शनचे वाटप करावे अन्यथा, राज्यात मोठं संकट निर्माण होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे. ते पुढे म्हणाले,’केंद्र सरकारने आम्हाला दिवसाला ५० हजार रेमडेसिविर इंजेक्शन देत महाराष्ट्राच्या नागरिकांच्या गरजा पूर्ण कराव्यात.” अशी मागणीही त्यांनी केली आहे.
तत्पूर्वी, रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा करणाऱ्या १६ कंपन्यांना महाराष्ट्र सरकारनं विचारलं असता त्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्राला औषधं पुरवू नका असं सांगितल्याचा खळबळजनक दावा केला आहे. जर या कंपन्यांनी महाराष्ट्राला औषधं पुरवली तर त्यांचा परवाना रद्द करू अशी धमकी केंद्र सरकारने कंपन्यांना दिल्याचा आरोप नवाब मलिकांनी केला होता.