जळगाव : अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्यमार्गावर पपई वाहून नेणारे वाहन उलटल्याने १५ मजुरांचा मृत्यू झाला आहे. तर दोघे गंभीर जखमी झाले. हा अपघात यावल तालुक्यातील किनगाव येथे मध्यरात्रीनंतर घडला.
धुळे जिल्ह्यातून पपई घेऊन जाणाऱ्या मालवाहू ट्रकला अपघात झाला. रस्त्यावर मोठा खड्डा असल्याने हा ट्रक उलटला. यातील १५ मजूर जागीच मृ्त्यूमुखी पडले. या ट्रकमध्ये एकूण २१ मजूर असल्याची माहिती मिळाली. त्यापैकी दोघे गंभीर जखमी आहेत.
मृत व जखमी मजुरांना यावल येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. पोलीस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे यांनी घटनास्थळी धाव घेतली. सर्व मजूर हे रावेर तालुक्यातील अभोडा केराळे व रावेर येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.