नगर – एकात्मिक गृह निर्माण प्रकल्प योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या वारूळाचा मारूती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत येथील असलेल्या समस्यांची पाहणी. समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश महापौर बाबासाहेब वाकळे यांनी संबंधित प्रशासनास दिले.
एकात्मिक गृह निर्माण प्रकल्प योजने अंतर्गत बांधण्यात आलेल्या वारूळाचा मारूती येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसाहत या ठिकाणी मनपाच्या सफाई कर्मचारी व या वसाहती शेजारी शहरातील झोपडपट्टीचे पुर्नवसन करून या ठिकाणी नागरिकांना घरे देण्यात आली. या घरकुलात राहणार्या नागरिकांना भेडसावत असलेल्या विविध समस्यांबाबत महापौर वाकळे यांच्याकडे परिसरातील नागरिकांनी समक्ष भेटून आपल्या समस्या सांगितल्या. याबाबत वाकळे यांनी या परिसराची पाहणी केली. यावेळी ते बोलत होते.
यावेळी शहर अभियंता सुरेश इथापे, पाणी पुरवठा विभाग प्रमुख आर. जी. सातपुते, विद्युत विभाग प्रमुख आर. जी. मेहेत्रे, अभियंता पारखे, कारभारी गवळी, कामगार युनियनचे अध्यक्ष अनंत लोखंडे, स्वच्छता निरीक्षक विधाते, शिवप्रकाश, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, सोनू चौधरी, शुभम वाकळे, संतोष ठोकळ, राधा सोनवणे, अशोक गायकवाड, पोपट लोखंडे, एकनाथ नन्नवरे, गणेश चांदणे, प्रभाकर पठारे, रंगनाथ गाडे आदी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वसाहतीतील नागरिकांनी गटारी साफ करणे, लाईटची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणे, ड्रेनेज लाईन टाकणे, बोअरिंगवर हातपंप बसविणे बाबत मागणी केली आहे. वाकळे म्हणाले, एकात्मिक गृह निर्माण प्रकल्प योजने अंतर्गत वारूळाचा मारूती येथे मनपाच्या कर्मचार्यांसह 700 ते 800 नागरिक राहतात. परिसरातील लाईटचा प्रश्न दोन दिवसात मार्गी लावण्याच्या सुचना विद्युत विभाग प्रमुख मेहेत्रे यांना देण्यात आल्या. अमृत योजने अंतर्गत पाणी पुरवठा योजने काम लवकर पूर्ण होत असून संपूर्ण शहराला पूर्ण दाबाने पाणी मिळणार आहे.
तो पर्यत सदर परिसरातील नागरिकांना मुबलक प्रमाणात पिण्याच्या पाण्यासाठी टॅकरने पाणी पुरवठा करण्यात यावा. सेप्टींक टॅक उपसा तातडीने करण्याच्या सुचना दिल्या. या वसाहतीपासून सीना नदीपर्यत ड्रेनेज लाइन कामाच्या लेव्हल घेवून कामाचे एस्टिमेंट करण्याच्या सुचना शाखा अभियंता यांना दिल्या. तसेच या ठिकाणी असलेल्या दोन बोअरिंगवर येत्या पंधरा दिवसात हातपंप बसविण्याच्या सुचना दिल्या. ठिकाणी बांधण्यात आलेली पिण्याच्या पाण्याची टाकी अमृत पाणी पुरवठा योजनेचे काम पूर्ण झाल्यावर भरण्यात येईल. त्यानंतर पाणी पुरवठा सुरळीत होणार आहे, असे वाकळे म्हणाले.