श्रीगोंदा -श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे याठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीत आमच्या पॅनलला मतदान न करता विरोधी पक्षाच्या पॅनेलला मतदान केले म्हणून घरात घुसून महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात दोघांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील बांगर्डे याठिकाणी ग्रामपंचायत निवडणुकीच्या कारणावरून गावातील काही इसम विनाकारण शिवीगाळ करीत असल्याचा आरोप गावातील महिलेने केला आहे. 28 जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या सुमारास पीडित महिलेच्या घरी अनिल बाबू थोरात व बाळू पिराजी थोरात हे दोघेजण आले. त्यांनी फिर्यादीस म्हटले की तू आमच्या ग्रामपंचायत पॅनलला मतदान केले नाही. तेव्हा फिर्यादीने त्यांना सांगितले की मी तुमच्याच पॅनलला मतदान केले आहे. त्यावेळीच अनिल थोरात व बाळू थोरात हे दोघे म्हणाले की, तुम्ही खोटे बोलत आहात असे म्हणत त्यांनी फिर्यादी महिलेचा विनयभंग केला.
त्यावेळी फिर्यादी महिलेने मोठ्यामोठ्याने आरडाओरड केली. महिलेचा पतीने पत्नीची सोडवणूक केली. त्यावेळी बाळू पिराजी थोरात यांनी हातातील गजाने महिलेच्या पतीच्या हातावर, मनगटावर व पायाच्या पिंडरी वरती गजाने मारहाण केली असल्याचे म्हटले आहे. विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा तपास पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप पितळे हे करत आहेत.