कोलकाता – वाहनांच्या ताफ्यावर तृणमूल कॉंग्रेसच्या समर्थकांकडून झालेला हल्ला ही सुरक्षा व्यवस्थेतील गंभीर त्रुटी असल्याचे सांगून केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्य सरकारकडून या संदर्भात अहवाल मागवला आहे.
या घटनेविषयी भाजपचे प्रदेशाध्यक्ष दिलीप घोष यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठवल्यानंतर लगेचच गृहमंत्रालयाकडून याबाबतचा अहवाल मागवण्यात आला.
सुमारे 200 जणांच्या जमावाने काठ्या, बांबू आणि दगडांनी वाहनांच्या ताफ्यावर हल्ला केला. या जमावाने कोलकातातील भाज्पच्या कार्यालयाबाहेर काळे झेंडे घेऊन निदर्शनेही केली.
कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या कारवर निदर्शक चढले आणि त्यांनी घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी हस्तक्षेप करून त्यांना हटवले नाही.
पोलिसांनी निदर्शकांना नड्डा यांच्या वाहनाजवळ जाऊ दिले, असे घोष यांनी गृहमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.