सातारा -जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पाच करोनाबाधितांचा मृत्यू झाला. गेल्या महिन्याभरात जिल्ह्यातील बाधितांचे प्रमाण कमी होत असताना करोनाबळी पूर्णपणे रोखण्यात प्रशासनाला अजूनही यश आलेले नाही; परंतु सलग दुसऱ्या दिवशी मृतांची संख्या घटल्याने काही अंशी दिलासा मिळाला आहे.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयात उपचार सुरू असताना अंबवडे, ता. सातारा येथील 60 वर्षीय पुरुष. जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असताना कासेगाव, ता. वाळवा येथील 70 वर्षीय पुरुष, आनेवाडी, ता. जावळी येथील 78 वर्षीय पुरुष, करंजे पेठ, सातारा येथील 72 वर्षीय महिला व उपळी-करंडी, ता. सातारा येथील 65 वर्षीय पुरुष, अशा एकूण पाच बाधितांचा मृत्यू झाल्याचे डॉ. चव्हाण यांनी सांगितले. जिल्ह्यात आतापर्यंत करोनाबळींची एकूण संख्या 1626 झाली आहे.