१४८ गावातील शेती पिकाला वादळाचा तडाखा
बेल्हे(प्रतिनिधी):– जुन्नर तालुक्याच्या पूर्व भागात चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पहाणी शनिवार (दि.६) रोजी कृषी अधिकारी एस. के.शिरसाठ, जिल्हा परीषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी राजुरी या ठिकाणी केली.
तालुक्यात झालेल्या चक्रीवादळामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.तालुक्यातील सुमारे ६ हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. यामध्ये विशेषकरुन केळी, द्राक्षे, डांळीब यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालेले असुन या परीसरात केळीच्या बागाच्या बागा पुर्ण सपाट झालेल्या आहेत.
“तालुक्यातील १४८ गावातील शेतीला वादळी वाऱ्याचा फटका बसला असून यामध्ये कृषी पिकाचे ४० ते ५० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील ६२५ हेक्टर केळीचे क्षेत्र जमिदोस्त झाली आहे. जवळजवळ ९९ टक्के केळीचे बागांचे नुकसान झाले. पंचनामा करण्याचे काम प्रगतीपथावर असून येत्या दीड ते दोन दिवसात सर्व काम पूर्ण होईल.”
-एस. के.शिरसाठ, कृषी अधिकारी (जुन्नर)
तालुक्याच्या पूर्व भागात शनिवारी जिल्हा परीषद सदस्य पांडुरंग पवार,तालुका कृषी अधिकारी सतीश शिरसाट, मंडल कृषी अधिकारी अनील गंभीरे ,राजुरी गावचे सरपंच एम.डी.घंगाळे ,कृषी अधिकारी राजश्री नरवडे,चंद्रकांत जाधव,मोहन हाडवळे,अविनाश पाटील औटी,सुभाष पाटील औटी,ग्रामविकास अधिकारी शरद बाळसराफ,जयसिंग औटी,तलाठी भाऊसाहेब कुमावत आदी मान्यवरांणी पहाणी केली.
“चक्रीवादळामुळे तालुक्यातील सुमारे सहा हजार हेक्टर क्षेत्रातील पिकाचे नुकसान झाले असून घरे, शाळा, ग्रामपंचायत कार्यलय,सभामंडप, समाज मंदिर,अंगणवाडी,शेती आदी सर्व मिळून तालुक्यात ६०० कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.तालुक्यातील सर्व नुकसानग्रस्तांना जास्तीत जास्त भरपाई मिळण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा चालू आहे.”
-अतुल बेनके,आमदार (जुन्नर)
परिसरात चक्रीवादळामुळे केळीच्या बागांचे व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असुन या शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाई मिळावी अशा मागणी जिल्हा परीषदेचे सदस्य पांडुरंग पवार यांनी तालुका कृषी अधिकारी शिरसाठ यांच्याकडे केली आहे.