ओतूर – आढळराव हे जाण आणि भान असलेले उमेदवार आहेत. 20 वर्षे त्यांनी या भागात कामे केली आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी आणि मोदींना पाठबळ देण्याचे काम आपल्याला करायचे आहे, असा निर्धार भाजप नेत्या आशाताई बुचके यांनी जुन्नर दौर्यात बोलताना केला.
जुन्नर तालुक्यात प्रचारदौर्यात गोवागावी मोठ्या संख्येने ग्रामस्थांनी आढळराव यांचे स्वागत केले. या दौर्यात ओझर, पिंपळगाव सिद्धनाथ, मढ, पिंपळगाव जोगा, उदापूर, ओतूर या गावांना भेटी दिल्या. त्यांच्या समवेत आमदार अतुल बेनके, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष पांडूरंग पवार, भाजपचे तालुका अध्यक्ष संतोषनाना खैरे, शिवसेनेचे तालुका प्रमुख सूर्यकांत ढोले,
आरपीआयचे तालुकाध्यक्ष पोपट राक्षे, राष्ट्रवादीच्या तालुका महिला कार्याध्यक्ष अॅड. संगीता हांडे, महिला तालुका अध्यक्ष सीमा रघतवान, भाजपचे उपतालुका प्रमुख संतोष खंडागळे, बाजार समिती संचालिका प्रियंका शेळके, दिलीप गांजळे, भाऊ कुंभार, वैष्णवी चतुर, सुनिता बोर्हाडे, महेंद्र सदाकाळ, विकास राऊत, महेंद्र मोजाड, आदी यावेळी उपस्थित होते.
आमदार अतुल बेनके म्हणाले, शाश्वतीने काम करणारा माणूस म्हणून आढळराव यांची गेल्या 20 वर्षांत लोकांशी नाळ जुळलेली आहे. विकासासाठी आम्ही जुन्नरकर त्यांच्या पाठीशी संपूर्णपणे राहणार आहोत असा निर्धार त्यांनी केला.
खासदारांनी निव्वळ गप्पा मारण्यापेक्षा स्थानिक प्रश्नांवर व्यक्त व्हायचे असते. केवळ भाषणे करून विकास होत नाही. अनेक वर्षे, लोकांशी माझी नाळ जुळलेली आहे. नरेंद्र मोदींच्या पाठबळासाठी त्यांच्या विचारांचा खासदार संसदेत गेला पाहिजे. -शिवाजीराव आढळराव पाटील, महायुतीचे उमेदवार शिरूर