नारायणगाव -अल्प मुदतीच्या (शॉर्टटर्म) व्हिसावर कतार येथे गेलेल्या महाराष्ट्रातील 49 जणांना परत येण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केलेले प्रयत्न यशस्वी झाले आहेत. मंगळवारी (दि. 7) हे सर्व 49 जण दोहा (कतार) येथून मुंबईत दाखल झाले आहेत.
सुनील गावडे, योगेश नाळे, अक्षय पवार, अंकुश जाधव यांसह 49 जण कंपनीच्या कामासाठी दोहा, कतार येथे गेले होते. त्यांचे काम संपवून ते परतण्याच्या तयारीत असतानाच कोव्हिड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आणि जगभरातील विमानसेवा बंद झाल्या, त्यामुळे गेल्या 3 महिन्यांपासून हे सर्वजण दोहा येथे अडकून पडले होते.
दरम्यान, या सर्वांना मुंबईतील ब्ल्यू एक्झिक्यटिव्ह हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.