कोल्हापूर – जिल्ह्यात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे. धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी सुरु असून जांबरे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला आहे. तसेच जिल्ह्यातील 28 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
मुसळधार पावसामुळे राधानगरी, घटप्रभासह सात प्रकल्पातून प्रतिसेकंद 15 हजार क्यूसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करण्यात येत आहे. यामुळे पंचगंगा, भोगावती, वारणा, घटप्रभा, हिरण्यकेशी, वेदगंगा नदीच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. तर राजाराम, इचलकरंजी, शिंगणापुरसह 28 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. दरम्यान, पंचगंगेची पाणी पातळी 21 फूट 5 इंचावर येऊन पोहचली आहे.