मुंबई – मावळते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांना त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीच्या शेवटच्या दिवशी सचिवालयातील कर्मचारीवर्गाने हृद्य निरोप दिला. एक तपाच्या या कारकिर्दीच्या अखेरीस अनेक कर्मचाऱ्यांनी केलेले नमस्कार स्वीकारताना नाईक यांचे अंतःकरण भरून आले.
62व्या वर्षी नवी नोकरी नको!
नवी दिल्ली – वयाच्या 62व्या वर्षी मला नोकरी शोधावी असे वाटत नाही, असे मिश्कील उत्तर मावळते मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. आपली बिहारच्या राज्यपालपदी नेमणूक होणार आहे का, या प्रश्नाला वरील उत्तर दिले.
शिक्षणावाचून प्रगती अशक्य आहे
जुन्नर – जे जे विशेष आहे ते ते शिक्षणातच आहे. संक्रमण, विकास, परिवर्तन याकरता शिक्षण आवश्यक आहे. लोकशाही सजवण्यासाठी शिक्षणाची नितांत जरूरी आहे. वैयक्तिक, सामाजिक व जागतिक विकासाचे कार्य शिक्षण करते, असे प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी मत व्यक्त केले.
हुकूमशाही काल्पनिक नाही
पाटणा – पंतप्रधान इंदिरा गांधी हुकूमशाहीच्या मार्गाने जाण्याचा धोका काल्पनिक नाही. जनतेने याचा प्रतिकार केला पाहिजे, असे आवाहन जयप्रकाश नाराण यांनी केले. भारत बांगलादेशाच्या मार्गाने जाण्याची दाट शक्यता आहे.