सोलापूर – सोलापूर जिल्हात मंगळवार अपघातवार ठरला कारण २४ तासांत तब्बल ४० अपघातांची नोंद झाली, ज्यात ७ जण ठार तर ३४ जण जखमी झाले आहेत. सिव्हिल पोलिस चौकीतील नोंदींवरून ही बाब पुढे आली आहे. अपघातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे.
मंगळवारी येथील महावीर चौकात झालेल्या अपघातात मृत्यू पावलेले तिघेही तरुण घरातील कमावते होते. तिघांवरही कुटुंबाची जबाबदारी होती. निखिल काेळी (वय २३) आणि इरण्णा मठपती (वय २३) हे आई वडीलांना एकुलते होते तर दिग्विजय सोमवंशी (वय २१) हा घरातील धाकटा. तो कुटुंबियांना अर्थिक मदत करण्यासाठी सलून दुकानाबरोबर एका कंपनीत ट्रेनी म्हणून काम करत होता.
तिघांच्या मृत्यूची वार्ता कळताच आई-वडीलांनी हंबरडा फोडला. त्यांच्या घराजवळ मित्र आणि नातेवाइकांनी गर्दी केली होती. निखिल हा मंडप टाकण्याचा काम करत असे. इरण्णा मठपती हा दुचाकी दुरुस्तीचे काम करायचा.
या लोकांचा मृत्यू
१. तेजस नाना गवळी, वय २०, भोलीवाडी, ता.मंगळवेढा – चारचाकी अपघात. २. इरण्णा मठपती, वय २३. ३. दिग्विजय सोमवंशी, वय २१. ५. निखिल कोळी, वय २३, रा. जुळे साेलापूर – होटगी रोड अपघात. ६. राधा मनोहर बंडगर, वय ७०, जागृती शिक्षक सोसायटी, शिवाजी नगर, बाळे. ७. दोन अनोळखी व्यक्ती.