मुंबई – कोविड काळात या रोगाची लागण होऊन ज्या पोलिस कर्मचाऱ्याचे किंवा अधिकाऱ्याचे निधन झाले आहे अशांच्या वारसांना राज्य सरकारने 138 कोटी रूपयांचे वित्त सहाय्य मंजुर केले आहे. ही माहिती राज्य सरकारने माहितीच्या अधिकारातील एका अर्जाला दिलेल्या उत्तरात दिली.
आत्तापर्यंत पोलिस दलातील 370 जण कोविड मुळे दगावले आहेत. त्यातील 123 जण मुंबई पोलिस दलातील आहेत. त्यांच्या वारसांना राज्य सरकारकडून मदत मिळावी अशी मागणी सातत्याने केली जात होती. पण राज्य सरकारने या आधीच त्यांना ही मदत मंजुर केली आहे असे सांगण्यात येते.
आत्तापर्यंत राज्य पोलिस दलातील 277 आणि मुंबई पोलिस दलातील 106 मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना ही आर्थिक मदत मंजुर झाली आहे अशी माहिती नागपुरचे निवासी संजय थुल यांनी माहिती अधिकारात केलेल्या अर्जात सरकारने दिली आहे.