पुणे : एल्गार परिषद प्रकरणी मानवी हक्क कार्यकर्ते गौतम नवलखा यांच्या जामीन अर्जावरील निकाल पुणे सत्र न्यायलयाने 12 नोव्हेंबरपर्यंत राखून ठेवला. तोपर्यंत पोलिसांनी त्यांच्यावर कोणतीही कारवाई करू नये, असे आदेशही न्यायलयाने दिले.
माओवाद्यांशी असणाऱ्या कथित संबंधांवरून नवलखा यांच्यावर आरोप ठेवण्यात आले. त्याबाबत त्यांनी जामीनासाठी उच्च न्यायलयात दाद मागितली होती. याबाबत कनिष्ठ न्यायलयात दाद मागावी असे सांगून ही याचिका फेटळली होती. त्यानंतर नवलखा यांनी पुणे सत्र न्यायलयात अर्ज दाखल केला होता. न्या. एस. आर. नवंदर यांच्या न्यायलयात ही सुनावणी झाली. पोलिसांनी त्यांच्यावर एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण करून एक जानेवारी 2018ला उसळलेल्या दंगलीला कारणीभूत ठरल्याच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला होता.