चेन्नई – तमिळनाडूतील चेन्नईमध्ये पाण्याचे संकट गडद झाले असून, पाण्यावरून हाणामाऱ्या होण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.
दरम्यान, पाणीटंचाईमुळे अनेक कंपन्यांनी आपले युनिट बंद केले असून, आयटी कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना घरूनच काम करण्यास सांगत आहेत. चेन्नई मेट्रो वॉटर सप्लायचे व्यवस्थापकीय संचालक टी.एन.हरिहरन यांनी सांगितले की, चेन्नईला दररोज 830 मिलियन लिटर (एमएलडी) पाणी लागते.