मुंबई – नारायण राणे यांच्या हॉस्पिटलनचे उद्घाटन करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्रात आले होते. तेव्हापासून राज्यातील सरकार पाडण्यात येणार असल्याचा चर्चा सुरू झाल्या. माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हटले की, आम्हीच फासा पलटवू. शिडीशिवाय फासा पलटवू. आम्ही पलटलेला फासा खूप मोठा असेल असं म्हणत राज्यात सत्तांतराचे संकेत दिले होते. त्यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली.
भाजप खासदार नारायण राणे यांना 20 वर्षे फासे फिरवण्याचा प्रयत्न केला. पण ते यशस्वी झाले नाहीत. त्यांना मुख्यमंत्री होता आलं नाही. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनाही फासे पलटवणं जमणार नाही. महाविकास आघाडी सरकार 25 वर्षे टिकेल, असा दावा अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला.
या व्यतिरिक्त राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी देखील सत्तांतराच्या चर्चांवरून भाजपवर टीका केली. पहिल्या दिवसापासून महाविकास आघाडीचे सरकार जाईल असं म्हणणाऱ्या लोकांना हे सरकार अजूनही चालत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे दर तीन महिन्याला सरकार पडणार असल्याचं विरोधक सांगतात. आपले आमदार पक्ष सोडून जाऊ नये या भीतीने कदाचित फडणवीस तसं बोलत असावेत, असा दावा रोहित पवार यांनी केला.