मनसेचे ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया
मुंबई : काही दिवसांपूर्वी नितीन नांदगावकर यांनी मनसेची साथ सोडत हाती शिवबंधन बांधून घेतले होते. नितीन नांदगावकर यांनी त्यावर स्पष्टीकरण देत काही मनसेतील काही नेत्यांमुळे हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे म्हटले होते. यावर आता मनसेचे ठाणे-पालघर जिल्ह्याचे अध्यक्ष आणि ठाण्याचे उमेदवार अविनाश जाधव यांनीदेखील आपली प्रतिक्रिया दिला आहे. नितीन नांदगावकर यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेण्यात खुप घाई केल्याचे ते म्हणाले.
नितीन नांदगावकर हे मनसेचे चांगले कार्यकर्ते होते. त्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घाईत घेतला. त्यांना याची भविष्यात नक्की जाणीव होईल, असं जाधव यावेळी म्हणाले. तसंच त्यांच्या समोर काही अडचणी असतील तर त्या त्यांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा करून सोडवायला हव्या होत्या. त्यातून नक्कीच मार्ग निघाला असता, असेही ते म्हणाले. नुकतेच नितीन नांदगावर यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला त्यानंतर त्यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली.