नगर-शहराच्या बालिकाश्रम रोड, येथील गौतमनगर भागात सार्वजनिक स्वच्छता गृहाची दुरावस्था झाली आहे. यामुळे या भागातील नागरिकांसह महिलांची मोठी कुंचबना होत असून, तातडीने स्वच्छता गृहाची दुरुस्ती करण्याची मागणी माजी नगरसेवक अजय साळवे यांनी केली आहे.
अन्यथा स्थानिक नागरिकांसह महापालिका आयुक्तांच्या दालनात उपोषण करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. अनेक वर्षापासून स्वच्छता गृहाच्या दुरुस्तीसाठी मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करुन देखील त्याची दखल घेण्यात आलेली नाही. महापौरांनी फक्त त्यांच्याच प्रभागापुरते दलित वस्ती सुधार योजनेची कामे करुन घेतली असा आरोप साळवे यांनी केला.