यवत -दौंड तालुक्यात अद्याप सुदैवाने एकही करोनाचा संसर्ग झालेला रुग्ण आढळून आलेला नाही. तरीही करोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी यवत (ता. दौंड) येथे शनिवार (दि. 11) ते सोमवार (दि. 13) पर्यंत “जनता कर्फ्यू’ पाळण्यात येत आहे.
गावात हॉस्पिटल, मेडिकल या अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने म्हणजे किराणा माल, फळे आणि भाजीपाला, चिकन आणि मटन दुकाने ही पूर्णतः बंद आहेत.
संचारबंदी असून कोणीही नागरिक घराबाहेर पडणार नाही आणि कोणतेही वाहन (आपत्कालीन कर्मचारी सोडून) गावातील रस्त्यावर दिसणार नाही असे आवाहन करण्यात आले आहे.