मुंबई – केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर करत नेत्यावर कारवाई केली जात असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडून वारंवारपणे करण्यात येत आहे. त्यातच आणखी एका शिवसेना नेत्याच्या मागे चोकशीचा ससेमिरा लागला आहे. ईडीने नवाब मलिक यांना अटक केली असल्याने महाविकास आघाडी आक्रमक झाली असतानाच प्राप्तिकर विभागाचे अधिकारी शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या घरी पोहोचले आहेत. एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार यशवंत जाधव यांच्या घरी प्राप्तिकर विभागाकडून धाड टाकण्यात आली असून चौकशी सुरु आहे. प्राप्तिकर विभागाचे पथक मनपाचे स्थायी समितीचे अध्यक्ष आणि शिवसेना नेते यशवंत जाधव यांच्या मुंबईतील घऱी पोहोचले आहे. माझ गाव मधील त्यांच्या निवासस्थानी तपास सुरु आहे.
यावर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी प्रतिक्रिया दिली असून शिवसैनिकांनी अनुचित प्रकार करू नये असे आवाहन त्यांनी केले आहे. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव हे नक्कीच प्राप्तिकर विभागाला हवी आलेली सर्व माहिती देतील. शिवसैनिकांनी अनुचित प्रकार करू नये. त्या पुढे म्हणाल्या आज ज्या प्रकारे यंत्रणांचा वापर करत आहात तो संपूर्ण महाराष्ट्र बघत आहे. जिथे भाजापाची सत्ता नाही तिथे हा त्रास होत आहे. म्हणून आम्ही घरात घाबरुन बसणार नाही. जे आहे ते तुम्हाला दाखवू.’ असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या
‘स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव हे भीमपुत्रं आहेत. संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुत्रं आहेत. ते कशाला कुणाला घाबरतील? ते संविधान मानणारे आहेत. कुणालाही घाबरणार नाहीत. ते असल्या धाडींना तर घाबरणारच नाही, असं महापौर किशोरी पेडणेकर ‘यांनी सांगितलं.
दरम्यान यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.’येत्या महिन्या भरात मुंबई महापालिका निवडणुका आहेत, त्यामुळे महापालिकेच्या वॉच मॅनवरही धाड टाकतील, त्याच कारण ते खिशाला धनुष्यबाण लावतात. मराठी लोकं आहेत त्यामुळे ते लावत असतात. त्यांच्यावरही हे धाड टाकू शकतात,” असा टोला संजय राऊतांनी लगावला आहे. असं म्हणत त्यांनी भाजप पक्षावर हल्लाबोल केला आहे.’