सविंदणे – मलठण-शिरूर रस्त्यावरील ओढ्यावरील पुलाचे काम अनेक दिवसांपासून अर्धवट स्थितीत आहे. सध्या ओढ्याला पाणी असल्यामुळे व रस्ता खोदून ठेवल्याने वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे.
सदर पुलाच्या कामाच्या ठिकाणी खोदकाम करून ठेवल्यामुळे गाड्या घसरून मोठा अपघात होण्याचा धोका वाढला आहे. घटनास्थळी यापूर्वी अपघात झाल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे रखडलेल्या रस्त्याच्या पुलाचे काम त्वरित पूर्ण करण्याची मागणी सरपंच प्रकाश गायकवाड व किरण देशमुख यांनी केली आहे.
शिरूर -मलठण मार्गे खेड, मंचर, नारायणगाव, भीमाशंकर, नाशिक येथे जाण्यासाठी हा एकमेव रस्ता असून या रस्त्यावर कायम वर्दळ असते. त्यामुळे या रस्त्यावरील रखडलेले पुलाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी वाहनचालकांकडून होत आहे.