मंचर, (प्रतिनिधी) – रासायनिक खतांच्या वापरामुळे नागरिकांमध्ये कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे. त्यासाठी सेंद्रिय शेती ही मानवाला जीवदान देणारी असल्याने सेंद्रिय शेतीचा वापर शेतकर्यांनी अधिक अधिक करावा, असे आवाहन सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ व जिज्ञासा लोकसंचालित साधन केंद्र मंचर यांचे मार्फत आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत महिला बचत गट उत्पादित वस्तूंचे प्रदर्शन उद्घाटन सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचे हस्ते शिवगिरी मंगल कार्यालय मंचर येथे करण्यात आले.
याप्रसंगी ते बोलत हाते. वळसे पाटील म्हणाले सद्यस्थितीत शेतकरी मोठ्या प्रमाणावर रासायनिक खते व कीटक नाशकांचा वापर करत आहे. त्याचा विपरीत परिणाम शरिरावर होत आहे. कॅन्सरच्या आजारात रासायनिक खते व कीटकनाशके भाजीपाल्याच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करत आहेत. याप्रसंगी राणी लक्ष्मीबाई बचत गट शिंगवे यांना दहा लाख कर्ज वितरित करण्यात आले.
बचत गटांनी स्वतः बँड विकसित करावा त्यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिले जाईल असे मंत्री महोदयानी सांगितले. या प्रसंगी पंचायत समितीचे माजी सभापती संजय गवारी, शरद बँकेचे माजी संचालक संजय चव्हाण, शिवव्याख्याते गुलाबराव वळसे पाटील सर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाअध्यक्षा सुषमा शिंदे,
मथाजी पोखरकर, विनायक कुलकर्णी, आशीष दगडे, संदेश पवार, सुनीता खोंड, सविता सयद व बचत गटातील महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमात अंतर्गत महिला बचत गटातील वस्तूंची पाहणी किरणताई वळसे पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विजय डोके यांनी केले. मनीषा जारकड यांनी आभार मानले.