नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना वेस्ट इंडिज संघाने पाच गडी गमावून 159 धावा केल्या आहेत. या मालिकेतील ही सर्वात मोठी धावसंख्या आहे. मालिकेत टिकून राहण्यासाठी भारताला कोणत्याही परिस्थितीत लक्ष्याचा पाठलाग करावा लागणार आहे.
वेस्ट इंडिज संघाकङून फलंदाजीत ब्रेंडन किंगने 42 आणि कर्णधार रोव्हमन पॉवेलने नाबाद 40 धावा केल्या. या दोघांशिवाय मेयर्सने 25 आणि पूरणने 20 धावांचे योगदान दिले.
भारताकडून गोलंदाजीत कुलदीप यादवने तीन बळी घेतले. अक्षर पटेल आणि मुकेश कुमार यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.
दरम्यान,वेस्ट इंडिज संघाने पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले असून मालिकेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी तिसरा सामना जिंकण्याची त्यांची इच्छा आहे. त्याचबरोबर हा सामना जिंकून मालिकेत कायम राहण्याचा भारताचा प्रयत्न असेल.