मुंबई – अजित पवारांच्या नेतृत्वात सत्तेत सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या वाट्याला अर्थमंत्री पदासह सर्व हेवीवेट खाती देण्यात आली आहेत. अजित पवारांची सत्तेत एंट्री झाल्यापासून शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरु आहे. अशात अनेक विरोधी नेत्यांकडून अजित पवार मुख्यमंत्री होणार असल्याचा सुरु लावला जात आहे. अजित पवारांच्या मुख्यमंत्री पदाबाबत आता माजी मंत्री बच्चू कडू यांनी भाष्य केले आहे.
राष्ट्रवादीकडे अर्थमंत्री पदासह कृषी,सहकार अशी महत्वाची खाती देखील देण्यात आली आहेत. राष्ट्रवादीने व्यवस्थित दबाव टाकलाय यामध्ये ते पूर्णपणे यशस्वी झाले आहेत हे त्यांना देण्यात आलेल्या खात्यांवरून दिसते असं बच्चू कडू म्हणालेत. एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत देखील वक्तव्य केलं.
अजित पवार मुख्यमंत्री होती असं वाटत का ? असा सवाल कडूंना विचारला असता ते म्हणाले,”पाच वर्षांचा कालखंड पाहिला तर नाही म्हणू शकत नाही आणि होय देखील म्हणू शकत नाही. अंदाजाच्या पलीकडचं सध्याचं राजकारण आहे. मी वीस वर्ष राजकारणात आहे. एवढ्या घडामोडी यापूर्वी कधीही पहिल्या नाही असं स्पष्ट मत यावेळी बच्चू कडूंनी व्यक्त केलं.
खाते वाटपणानंतर तुमचं मुख्यमंत्री शिंदेंशी काही बोलणं झालं का ? असं देखील बच्चू कडूंना विचारण्यात आलं. त्यावर बोलणं झालं नसल्याचे त्यांनी सांगितलं. रेंजेच नाही. मी नेटवर्कच्या बाहेर आहे. मंत्रालयाच्याच नेटवर्कच्या बाहेर आहे असंही ते यावेळी म्हणाले. तसेच लवकरच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार असलयाचे त्यांनी सांगितले.