जयपूर – मध्य प्रदेशातील नवविवाहित वधू तिच्या पतीसोबत हनिमून साजरा करण्यासाठी गुलाबी शहरात म्हणजेच जयपूरमध्ये आली होती. जयपूरच्या पर्यटन स्थळांना भेट दिल्यानंतर दोघेही हॉटेलवर पोहोचले आणि पती कार बुक करण्यासाठी बाहेर पडला. काही वेळाने तो परत आला तेव्हा पत्नी खोलीत नसल्याचे त्याने पाहिले. पतीने पत्नीचा सर्वत्र शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये राहणाऱ्या 24 वर्षीय तरुणाचा विवाह 22 वर्षीय तरुणीसोबत 29 जुलै रोजी भोपाळमध्येच झाला होता. लग्नानंतर दोघेही 5 ऑगस्टला हनिमून साजरा करण्यासाठी जयपूरला आले होते. चौमुन पुलियाजवळच्या हॉटेलमध्ये रूम बुक केली होती.
रात्री 12 वाजण्याच्या सुमारास पती-पत्नी दोघेही अंबर किल्ल्यावर फिरण्यासाठी बाहेर पडले आणि 3 वाजण्याच्या सुमारास फेरफटका मारून हॉटेलवर परतले. थकलेल्या पती-पत्नीने काही वेळ विश्रांती घेतल्यानंतर सीकरमधील रिंगास येथील बाबा खातुश्याम जी मंदिरात जाण्याचा बेत आखला. यानंतर पती पत्नीला खोलीत सोडून हॉटेलजवळ कार बुक करण्यासाठी गेला. कार बुक केल्यानंतर अवघ्या 15 मिनिटांनी वर हॉटेलच्या खोलीत आले, मात्र वधू सापडली नाही.
या हनिमूनदरम्यान नवदाम्पत्यामध्ये सातत्याने काही वाद सुरु असल्याचे सीसीटीव्हीमध्ये दिसून आले. पती-पत्नीमधील वितुष्टानंतरच पत्नी संतापली आहे. सीसीटीव्ही पाहिल्यावर त्याची पत्नी सामानासह हॉटेलमधून बाहेर पडताना दिसली. त्रस्त पतीने लगेचच झोटवाडा पोलीस ठाण्यात वधू हरवल्याची तक्रार दाखल केली. यामध्ये चोरीची घटना घडली नसल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.