पुणे : आजारपण ही तशी वाईट गोष्ट. मात्र, मुलीचे आजारपणामुळे दोघांच्या संसारासाठी वरदान ठरले आहे. सहा वर्षे वेगळे राहणारे दोघे मुलीला डेंगू झाल्याने महिनाभर एकत्र राहिले. तिच्या भवितव्याचा विचार करत दोघांनी कायमस्वरूपी एकत्र राहण्याचा निर्णय घेतला. वकिलांनी केलेले समुपदेशन महत्त्वाचे ठरले. त्यांचा नात्यातील सहा वर्षाच्या दुरावा संपला.
माधव आणि माधवी (दोघांची नावे बदलली आहेत) अशी दोघांची नावे आहेत. दोघेही उच्चशिक्षित. आयटी क्षेत्रात कार्यरत. तो उत्तरप्रदेशचा, तर ती पश्चिम बंगाल येथील. बेगलोर येथे एका कंपनीत कामाला होते. सुरूवातीला मैत्री आणि नंतर त्याचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनी २००९ मध्ये विवाहही केला. संसार सुरळीत सुरू असताना दोघे हिंजवडी येथे स्थलांरीत झाले.
दोघांना २०१८ मध्ये एक मुलगी झाली. त्यानंतर माधवची परदेश वारी झाली. दोघात चारित्र्याच्या संशवारून वाद होऊ लागले. वाद इतके विकोपाला गेले की, दोघे विभक्त राहू लागले. तिने २०२० मध्ये प्रथमवर्ग् न्याय्दंडधिकार्यांच्या न्यायालयात त्याच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचार कायद्यानुसार दावा दाखल केला.
तर त्यानेही वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायाधीश यांच्याकडे अॅड.प्रणयकुमार लंजिले, अॅड. अनिकेत डांगे आणि अॅड. लक्ष्मण सावंत यांच्यामार्फत घटस्फोटासाठी अर्ज केला. दोघातील वाद सुरूच होते. दरम्यान सहा वर्षीय मुलगी आजारी पडली. तिला डेंगू झाला. तिला काही दिवस रुग्णालयात उपचारासाठी ठेवण्यात आले.
त्या कालावधीत माधवही रुग्णालयात राहिला. दरम्यान मुलीच्या हट्टानुसार आणखी काही दिवस दोघे घरी एकत्र राहिले. मुलीने ‘मम्मी-पप्पा’ दोघेही हवे असल्याचे म्हटले. तिच्या या म्हणण्यानंतर दोघे आपसातील वाद विसरले. नव्याने दोघांनी संसार सुरू केला.
प्रत्येक दांपत्याच्या आयुष्यात मुलाचे अन्यसाधारण महत्त्व आहे. याबाबत पटवून् दिल्यास आपसातील वाद-विवाद विसरून दोघे एकत्र येऊ शकतात. इथे समुपदेशान केल्यानंतर मुलीच्या भवितव्याचा विचार करून दोघे एकत्र आले. पटवून दिल्यास अशाच प्रकारे आपसातील वाद विसरून दांपत्य एकत्र येऊ शकतात.
– अॅड. प्रणयकुमार लंजिले, पतीचे वकील.