साऊथकडे अभिनेता अल्लू अर्जुन आणि अभिनेता यश या दोन सुपरस्टारचा चाहता वर्ग भरपूर मोठा आहे. या दोघांच्या चाहत्यांमध्ये नेहमीच त्या दोघांनसाठी वेडेपणा पाहायला मिळतो. अशात अल्लू अर्जुनचे वडील आणि निर्माते अरविंद यांनी नुकतेच असे विधान केले होते, ज्यामुळे केजीएफ स्टार यशचे चाहते संतापले आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, यात अरविंद हे नुकतेच कलाकारांच्या फी वाढीमुळे चित्रपटाच्या बजेटवर कसा परिणाम होतो याबद्दल बोलत होते. यादरम्यान त्याने अभिनेता यशबद्दल असे काही बोलले, ज्यामुळे आता ते ट्रोल होत आहे.
अल्लू अरविंद कोटाबोमाली पीएस या चित्रपटाच्या टीझर लॉन्चला उपस्थित होते. येथे त्यांनी चित्रपटाच्या वाढत्या बजेटचे स्पष्टीकरण देत फी वाढवणाऱ्या कलाकारांवर निशाणा साधला. यावेळी केजीएफ ‘रॉकी भाई’ यशवर मोठे वक्तव्य केले आहे. अल्लू अरविंद म्हणाले की, ‘चित्रपट हिट झाल्यानंतर कलाकार ज्या प्रकारे फी वाढवतात, त्यामुळे चित्रपटाचे संपूर्ण बजेट बिघडते.
ते पुढे म्हणाले, KGF च्या ब्लॉकबस्टर यशानंतर यश पॅन इंडियाचा स्टार बनला. KGF रिलीज होण्यापूर्वी यश कोण होता? त्या चित्रपटाची इतकी चर्चा का झाली? त्या चित्रपटाच्या मेकिंग आणि समृद्धतेमुळेच त्याला यश मिळाले. हे फक्त एक उदाहरण आहे. चित्रपटाचा नायक कोणीही असला तरी तो मेकिंगमुळेच प्रेक्षकांना आकर्षित करतो.’ त्यांच्या या विधानावरून आता सोशल मीडियावर यशचे चाहते अल्लू अर्जुनसह अरविंदला ट्रोल करत आहे.