Sara Ali khan : ‘कॉफी विथ करण’ च्या आठव्या पर्वाला देखील प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. रणविर-दिपीका, सनी देओल आणि बॉबी देओल यासारख्या सेलिब्रिटींनी या शोमध्ये हजेरी लावत अनेक गोष्टींचा खुलासा केला. नुकत्याच झालेल्या या शोमध्ये अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सारा अली खान (Sara Ali) या दोघींनी हजेरी लावली होती. यावेळी दोघींनी त्यांचा कॉमन बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनबद्दल काही गोष्टी सांगितल्या. इतकेच काय तर साराने कार्तिकसोबतच्या ब्रेकअपवर देखील भाष्य केले आहे.
करणने ब्रेकअपनंतर एकमेकांशी मैत्री करणे सोपे आहे का? कारण तुमच्या दोघींचा बॉयफ्रेंड कॉमन आहे. सारा या प्रश्नाचे उत्तर देत म्हणाली की, ‘हे नेहमीच सोपे नसते. जेव्हा तुम्ही एखाद्याशी नातेसंबंधात असता, मग ती मैत्री असो, व्यावसायिक असो किंवा रोमँटिक असो, विशेषत: जर मी असेन, तर मी नात्यात पूर्णपणे गुंतते आणि मी नात्यात गुंतवणूक करते. आजची परिस्थिती एक असू शकते आणि उद्या ती काहीतरी वेगळी असू शकते. या गोष्टीचा तुमच्यावर परिणाम होतो. पण शेवटी तुम्हाला त्यातून पुढे जावे लागते.”
पुढे सारा म्हणाली की, “इंडस्ट्रीत कोणतीही मैत्री आयुष्यभर टिकत नाही आणि शत्रुत्वही नाही. जे आज बोलत नाहीत ते उद्या बोलू शकतात. तसेच बॉलिवूडमध्ये बेस्ट फ्रेंडशिप किंवा पिंकी प्रॉमिस असे काहीही नाही.” सध्या साराने केलेल्या विधानाची चांगलीच चर्चा रंगली आहे. दरम्यान, साराने यापूर्वी ‘कॉफी विथ करण’ शोमध्ये कार्तिक आवड असल्याची कबुली दिली होती. त्यानंतर, या जोडप्याने 2020 मध्ये इम्तियाज अलीच्या ‘लव्ह आज कल’ चित्रपटाच्या सिक्वेलमध्ये काम केले आणि चित्रपट रिलीज झाल्यानंतर लगेचच वेगळे झाले होते.