जळोची: केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन या दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. आज त्यांचा दौऱ्याचा शेवटचा आहे. आणि विरोधी पक्ष नेते हे देखील बारामतीत आहेत. अजित पवार हे नेहमी सामान्यांच्या प्रश्नासाठी जनता दरबार घेत असतात, आजही तो जनता दरबार भरला आहे, मात्र या जनता दरबाराला दुप्पट नागरिकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे कुठल्याही पक्षाने या ठिकाणी निवडणुकीसाठी फिल्डिंग लावली तरी पवारांची “पॉवर” काही कमी होणार नसल्याचे आजच्या जनता दरबारावरून लक्षात येत आहे.
विरोधी पक्ष नेते अजित पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. येथील विद्याप्रतिष्ठान येथे ते जनता दरबार घेत आहेत.मतदार संघातील लोकांना त्यांच्या कामासाठी पुणे- मुंबईत भेटायला येऊ लागू नये, म्हणून पवार स्वतः लोकांना भेटत असतात. यावेळी सर्व शासकीय अधिकारी वर्ग उपस्थित असतो.
नागरीकांचे ज्या विभागाकडे काम आहे. त्या विभागाच्या अधिकाऱ्यांकडे ते नागरिकांचे निवेदन देतात आणि तत्काळ मार्ग काढण्याचे आदेश अजित पवार देत असतात. अजित पवारांना भेटण्यासाठी लोकांनी लांबच लांब रांगा लावल्या आहेत.
आठवड्याच्या प्रत्येक शनिवार आणि रविवार हा अजित पवार हे बारामतीकरासाठी देत असतात. यात त्यांचा जनता दरबार, सर्वसामान्यांच्या समस्या जाणून घेण्याचे काम करतात. शक्य असल्यास जागेवरच त्यांचे निरसन करतात. अजित पवारांची ही कामाची पद्धत ही संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहे.