मुंबई – पोटनिवडणूक जिंकलो तेव्हा भाजपने हिंदुत्व म्हणून एकत्र आलो. पण सत्ता नसताना देखील जे एकत्र येतात ते चिरकाल टिकतात. मी आज समाजवादी पक्षासोबत (Samajwadi Party) येत असल्याने तुमच्या पोटात दुखण्याचा कारण काय. या पक्षामध्ये मुस्लिम देखील आहेत. पण ते देशावर प्रेम करणारे आहेत. तुम्ही गुजरातमध्ये पाकिस्तानी संघावर फुलांचा वर्षाव करु शकता मग आम्ही समाजवादी पक्षासोबत आलो तर अडचण काय?, असा सवाल करत उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांनी भाजपवर निशाणा साधला.
शिवसेना ठाकरे गट (Shivsena thackeray group) आणि समाजवादी पक्षाची (Samajwadi Paksh) संयुक्त बैठक रविवार (15 ऑक्टोबर) रोजी पार पडली. या बैठकीमध्ये उद्धव ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्याची चळवळ झाली तेव्हा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ झाली. तेव्हा संघ कुठे होता असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पण त्यावेळी जनसंघ होता. त्यावेळी जनसंघाने देखील संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये सहभाग घेतला, असा टोलाही त्यांनी लगाविला.
मागे एका व्यक्तीने ज्या बोटाने भाजपला (bjp) मत दिलं तेच बोट त्याने कापले. कारण त्याचा भ्रमनिरास झाला. मी कोणाच्या हातात माझ्या देशाचे भविष्य दिले. त्यामुळे हा त्याचाच नाही तर संपूर्ण देशाचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे लोकांनी ठरवले, तर आपल्याला हा देश नक्की सुधारता येईल. त्यामुळे तुम्ही जर तेव्हा आणि आजही शिवसेनेसोबत उभे राहिला असता तर आज महाराष्ट्रात शिवसेनेची ताकद झाली असती, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांना महात्मा फुले यांची पगडी घालण्यात आली. यावर बोलताना त्यांनी म्हटले की, महात्मा फुलेंची पगडी (Mahatma phule Pagadi) घालण्यासाठी तितकं मोठं डोकं लागतं, मी तितका मोठा नाही. त्यामुळे मी त्यांना म्हटले की, ती माझ्या हातात द्या. मी मुख्यमंत्री असताना लाडका होतो, पण आता कोणीही मला लाडके माजी मुख्यमंत्री असे म्हणत नाही, अशी मिश्किल टीप्पणी देखील त्यांनी केली.