Manoj Jarange : राज्यात मराठा समाजाच्या (maratha reservation) मागणीच्या आंदोलनाने आक्रमक स्वरूप धारण केले आहे. कारण एका महिन्याची मुदत देऊनही सरकारकडून आरक्षणाच्या मुद्द्यावर कोणताही तोडगा काढता आला नाही त्यामुळे पुन्हा एकदा या मागणीसाठी मनोज जरांगे (Manoj Jarange) पाटील हे बेमुदत उपोषणासाठी बसले आहेत. मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा सातवा दिवस आहे. अशात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनोज जरांगे यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात फोनवर २४ मिनिटे चर्चा झाली. अशात शिंदे लवकरच मराठा आरक्षणविषयक अभ्यासक यांना बोलवून त्यांचाशी चर्चा करुन पुन्हा जरांगे यांच्याशी बोलणार आहेत.
आरक्षण विषयावर गंभीरपणे चर्चा झाली आहे. मात्र मी अर्धवट आरक्षण घेणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यात नेमकी काय चर्चा झाली याची माहिती ते पत्रकार परिषदेत देणार आहेत.
तत्पूर्वी, उपोषणाच्या सहाव्या दिवशी जरांगे यांची प्रकृती खूपच खालाव,ली त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे. आता तर त्यांना धड उभही राहता येत नाहीय. अशात मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) स्टेजवरच कोसळले. या दरम्यानचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. त्यावेळी त्यांना आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या दोघांनी सावरलं आणि आधार दिला.
अशात उपोषणाच्या सहाव्या दिवशी उपसमितीच्या बैठकीतही ठोस निर्णय न झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. तर, दुसरीकडे अनेक ठिकाणी दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही नाराजी व्यक्त केली होती. तसंच, आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न असून जाणीवपूर्वक असे प्रकार घडवून आणले जात आहेत का याबाबत मराठा समाजाने सजग असायला हवं असंही म्हटलं. तसंच, राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनीही असाच रोख व्यक्त केला आहे.