मुंबई : मुंबईला महाराष्ट्रापासून तोडण्याची कोणाची हिंमत नाही. तसा कोणी विचारही करू शकत नाही. आम्हाला मुंबई महाराष्ट्रापासून नव्हे, तर शिवसेनेच्या भ्रष्टाचारापासून वेगळी करून महाराष्ट्राला भूषण वाटेल अशी मुंबई तयार करायची असल्याचा निर्धार विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कालच्या सभेत केला. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या टीकेला हे उत्तर दिले असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील प्रत्युत्तर दिले आहे.
भाजपातर्फे हिंदी भाषी महासंकल्प सभा गोरेगावातील नेस्को मैदानावर रविवारी पाड पडली. यावेळी फडणवीस यांनी आपल्या भाषणात ठाकरे यांनी भाजपावर केलेल्या आरोपांना उत्तर दिले. अयोध्येला गेलो तेव्हा मी नगरसेवक आणि वकील होतो, असे सांगत गोळ्या -लाठ्यांची पर्वा न करता अयोध्या आंदोलनात गेलो होतो. बाबरी पाडायला गेलो होतो. तुम्हाला मिर्ची का लागली, असा सवाल फडणवीस यांनी एका गाण्याचे बोल वापरत केला.
यावर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीही याबाबत भाष्य केले आहे. अमृता फडणवीस यांनी एक ट्विट करत मुख्यमंत्र्यावर अप्रत्यक्षरित्या निशाणा साधला आहे. “वज़नदार ने हल्के को, बस हल्के से ही वज़न से, कल ‘हल्का’ कर दिया,” असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.
वज़नदार ने हल्के को,
बस हल्के से ही वज़न से,
कल ‘हल्का’ कर दिया … 🙃#Maharashtra— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) May 16, 2022