Jyotiraditya Shinde – गेल्या काही दिवसांपासून दिल्ली विमानतळावर दाट धुक्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत होत आहे. त्यामुळे अनेक विमानांना दुसरीकडे वळवावे लागते. आजही असाच प्रकार झाला. त्यामुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली आहे.
या संबंधात नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी शुक्रवारी सांगितले की आमचे मंत्रालय विमानतळ अधिकारी आणि विमान कंपन्यांशी समन्वय साधत आहे आणि या समस्येला सामोरे जाण्यासाठी उपाययोजना करत आहे.
धुक्याच्या समस्येला “तात्पुरती समस्या” असे संबोधून दिलेल्या मुलाखतीत ज्योतिरादित्य म्हणाले की धुक्याच्या घनतेच्या बाबतीत यावर्षी परिस्थिती थोडी अभूतपूर्व आहे.
ते म्हणाले की, धुक्याची समस्या ही एक समस्या अशी आहे की जी आम्हाला दरवर्षी १५-२० दिवस भेडसावते. सध्या गेल्या तीन-चार दिवसांपासून अभूतपूर्व धुके आहे. त्यावर आम्ही तांत्रिक उपाययोजना करण्याचा प्रयत्न करीत आहोत असे ते म्हणाले.