मुंबई – मागील काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यात शाब्दिक चकमक सुरू आहे. चंद्रकांत पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्र झोपेत असताना पडेल अस भाकित केल होतं. त्यावर अजित पवारांनी कडाडून टीका केली होती. त्यामुळे संतापलेल्या चंद्रकांत पाटलांनी म्हटलं होतं की, अजित पवारांनी भाषा जपून वापरावी. आता या वादावर चंद्रकांत पाटील यांना पडदा टाकत शिवसेनेवर हल्लाबोल केला आहे.
आमचा राग अजित पवार यांच्यावर नसून दगाबाज शिवसेनेवर असल्याचे पाटील यांनी म्हटलं आहे. ते पुढं म्हणाले की, अजित पवार आणि माझा काही बांधाला बांध नाही. आमचा वैयक्तीक वादही नाही. मात्र ते आमच्या पक्षाबद्दल बोलले तर मी बोलणारच. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल बोलल्यास आम्ही बोलणारच.
दरम्यान सरकार पडलं म्हणून माझा आणि देवेंद्र फडणवीस यांचा अजित पवार यांच्यावर राग नाहीच. शिवसेनेने आम्हाला दगा दिला, त्यामुळे त्यांच्यावर राग आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं.
यावेळी चंद्रकांत पाटील यांनी आघाडी सरकारवर टीका केली. या सरकारमध्ये कोणत्याही मुद्द्यावर एकवाक्यता नाही. प्रत्येकाला माध्यमांसमोर येण्याची घाई झाल्याचं ते म्हणाले.